महाराष्ट्रद्रोह्यांना लोकं जागेजागी चपला मारतील; संजय राऊत यांनी पुन्हा केले भाजपला लक्ष्य

मुंबई – राज्यात कायदा सुव्यवस्था आहे की नाही असा सवाल उपस्थित करण्याची वेळ आली आहे. कारण विरोधी पक्षातील नेत्यांवर सत्ताधारी मंडळींकडून हल्ले करण्यात येत असल्याचे वारंवार समोर येत आहे. नुकताच खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा (MP Navneet Rana and MLA Ravi Rana) यांना पोलिसांनी  अटक  केल्यानंतर  त्यांना भेटायला आलेले भाजपा नेते किरीट सोमय्या (BJP leader Kirit Somaiya) यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केला आहे.

त्याआधी भाजप नेते मोहित कंभोज (Mohit Kambhoj)  यांच्यावर देखील शिवसैनिकांनी हल्ला केला होता. याशिवाय आमदार गोपीचंद पडळकर(gopichand padalkar)  यांच्यावर सुद्धा प्राणघातक हल्ला झाला होता सोबतच  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devandra fadanvis) यांच्या गाडीवर सुद्धा चप्पलफेक करण्यात आली होती. या सर्व घडामोडी घडत असताना राष्ट्रपती राजवट लावली जावी अशी मागणी केवळ विरोधकच नव्हे तर सामान्य जनता देखील करू लागली आहे.

यातच आज भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला झाल्यानंतर आज ते दिल्लीला केंद्रीय गृहसचिवांना भेटीला पोहोचले होते. यावरुन शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर पुन्हा टीका केली आहे. दोन-चार लोकं जातात. दिल्लीला उतरतात, पत्रकारांना भेटतात, महाराष्ट्राची बदनामी करतात.  महाराष्ट्राच्या बदनामीचे हे षडयंत्र आहे, आणि हे षडयंत्र असंच सुरु राहिलं तर ह्या महाराष्ट्रद्रोह्यांना लोकं जागेजागी चपला मारतील, असं ते म्हणाले.

राऊत यांनी म्हटलं आहे की, उत्तर प्रदेशात सरकार आल्यापासून मागील 3 महिन्यात 17 बलात्कार झाले. तिथे लावता का राष्ट्रपती राजवट? महाराष्ट्रात या लोकांना कामधंदा नाही. तुमचे काही प्रश्न असतील कायदा आणि सुव्यवस्थासंदर्भात तर तुम्ही राज्याच्या गृहमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना भेटीला हवं.  उत्तर प्रदेशातील घटनांबाबत गृहमंत्र्यांना कोणी माहिती देत असले तर त्यांनी माहिती घेतली असेल. राष्ट्रपती राजवट लावायची असेल तर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात एकत्रित लावा, ही सगळी ढोंगं चालली आहेत, असं राऊतांनी म्हटलं आहे.