Ramdas Athawale | डॉ.बाबासाहेब आंबेडकर नसते तर, आम्ही नसतो; रामदास आठवले झाले भावूक
Ramdas Athawale | महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आहेत. या देशाचे भाग्यविधाते आहेत. भारत देशाचा आत्मा आहे. देशाला सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने घेऊन जाणारे क्रांतिसूर्य डॉ.बाबासाहेब अंबेडकर झाले नसते तर आम्ही कुठेच नसतो. ते होते म्हणून आम्ही आहोत. त्यांच्यामुळेच आम्ही सुटा-बुटात दिसत आहोत. ते नसते तर आम्ही कुठेच नसतो असे प्रदिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी केले.
धारावी येथे प्रज्ञा बुध्द विहार सेवा समितीच्या वतीने आयोजित महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंती उत्सवा निमित्त आयोजित कार्यक्रमात रामदास आठवले बोलत होते. यावेळी विचार मंचावर रिपाइंचे मुंबई प्रदेश अध्यक्ष सिध्दार्थ कासारे;,दिलीपदादा जगताप,साधु कटके,प्रकाश जाधव आदि अनेक मान्यंवर उपस्थितीत होते.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
Sunil Tatkare | संविधान बचाव नावाने विरोधकांनी प्रचाराची वैचारिक पातळी खाली आणलीय