सोमय्यांनी घेतली गृहसचिवांची भेट! किरीट सोमय्यांनी दिली महत्वाची माहिती, शिवसैनिकांच्या हल्ल्याची चौकशी लवकरच

मुंबई – राज्यात कायदा सुव्यवस्था आहे की नाही असा सवाल उपस्थित करण्याची वेळ आली आहे. कारण विरोधी पक्षातील नेत्यांवर सत्ताधारी मंडळींकडून हल्ले करण्यात येत असल्याचे वारंवार समोर येत आहे. नुकताच खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा (MP Navneet Rana and MLA Ravi Rana) यांना पोलिसांनी  अटक  केल्यानंतर  त्यांना भेटायला आलेले भाजपा नेते किरीट सोमय्या (BJP leader Kirit Somaiya) यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केला आहे.

त्याआधी भाजप नेते मोहित कंभोज (Mohit Kambhoj)  यांच्यावर देखील शिवसैनिकांनी हल्ला केला होता. याशिवाय आमदार गोपीचंद पडळकर(gopichand padalkar)  यांच्यावर सुद्धा प्राणघातक हल्ला झाला होता सोबतच  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devandra fadanvis) यांच्या गाडीवर सुद्धा चप्पलफेक करण्यात आली होती. या सर्व घडामोडी घडत असताना राष्ट्रपती राजवट लावली जावी अशी मागणी केवळ विरोधकच नव्हे तर सामान्य जनता देखील करू लागली आहे.

दरम्यान, या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या   आणि भाजपच्या शिष्टमंडळाने दिल्लीत गृहसचिवांची भेट घेतली. 20 ते 25 मिनीट ही भेट झाली. यामध्ये राज्यात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यावर आम्ही चर्चा केली. ( Kirit Somaiya Met The Home Secretary ) त्यावर गृहसचिवांनी चिंता व्यक्त केली अशी माहिती सोमय्या  यांनी दिली आहे. यावर आम्हाला जे आवश्यक वाटेल ती कारवाई आम्ही करणार आहोत अशी ग्वाही गृहसचिवांनी आम्हाला दिली अशी माहितीही सोमय्या  यांनी दिली आहे.

राज्यात संविधानाला पायदळी तुडवण्याचा प्रयत्न होत आहे. वारंवार खोट्या केस दाखल केल्या जातात.त्यामाध्यमातून आम्हाला टार्गेट केले जाते अशी माहितीही गृहसचिवांना दिली आहे. त्यावर गृहसचिवांनी एका अधिकाऱ्याला राज्यात पाठवून पुर्ण सखोल चौकशी केली जाईल असही सोमय्या बोलताना यावेळी म्हणाले आहेत. आयपीएस अधिकारी संजय पांडे (IPS officer Sanjay Pandey) या अधिकाऱ्याचीही चौकशी करणार आहोत असही त्यांना आश्वस्थ केल्याची माहिती आहे.