‘लाचार संजय राऊत यांना स्मृतीभ्रंश झालाय’

पुणे – पुण्यात एका कार्यक्रमादरम्यान शिवसेना नेते संजय राऊत (Shiv Sena leader Sanjay Raut)  यांची विशेष मुलाखत घेण्यात आली.यावेळी संजय राऊत यांना विचारण्यात आलं की महाविकास आघाडीचा(MVA)  प्रयोग बाळासाहेबांना (Balasaheb Thackeray) आवडला असता का? असा सवाल उपस्थित करण्यात आला होता. यावर शिवसेना आणि शरद पवार (sharad pawar) यांनी एकत्र येण्याबाबत बाळासाहेब ठाकरे यांचीही भूमिका होती. असं त्यांनी म्हटलं आहे.

ते पुढे म्हणाले, मुळात बाळासाहेब असते तर त्यांची असं काही करायची हिंमत झाली नसती. बाळासाहेबांना ते चळाचळा कापायचे. मातोश्रीवर येण्याआधी दहावेळा विचार करायचे. आता परिस्थिती बदलली आहे असं नाही. पण आता शिवसेनेचे नेतृत्व टोकाचे सुसंस्कृत. पण आमच्यावर बाळासाहेबांचा प्रभाव आहे.

दरम्यान, आता या मुद्द्यावरून मनसेचे नेते गजानन काळे (MNS leader Gajanan Kale) यांनी भाष्य करत राऊत यांना फैलावर घेतले आहे. ते म्हणाले,  संजय राऊत म्हणतात आताचे सरकार हे बाळासाहेबांच्या स्वप्नातील सरकार आहे. मा.बाळासाहेब असते तर हे सरकार बनवायचा प्रस्ताव आणणाऱ्यांच्या पेकाटात लाथ घातली असती. हिंदु द्वेष करणाऱ्या काँग्रेस,राष्ट्रवादीबद्दल बाळासाहेबांनी अनेकदा आसूड ओढले आहेत.लाचार संजय राऊत यांना स्मृतीभ्रंश  झालाय. असं काळे यांनी म्हटलं आहे.