‘शरद पवार हे कधीच कुणाशी विश्वासाने वागले नाहीत, जे त्यांच्याबरोबर गेले त्यांचे त्यांनी वाटोळेच केले’ 

खटाव : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर भाजपचे आमदार व जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे यांनी टीकास्त्र सोडले आहे.पवारांनी अनेकांचा विश्वासघात केल्याचा आरोप गोरे यांनी केला असून  शरद पवार हे कधीच कुणाशी विश्वासाने वागले नाहीत. जे त्यांच्याबरोबर गेले त्यांचे त्यांनी वाटोळेच केले. असा घणाघात गोरे यांनी केला आहे.

सातारा जिल्ह्याने त्यांची पाठराखण केली. मात्र, त्यांनी जिल्ह्याला काहीच दिले नाही. आपला वापर करून स्वतःचा स्वार्थ त्यांनी साधला, अशी टीका  जयकुमार गोरे यांनी खासदार शरद पवार यांच्यावर केली आहे.  राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार कधीच कुणाशी विश्वासाने वागले नाहीत. जे त्यांच्याबरोबर गेले त्यांचे त्यांनी वाटोळेच केले. सातारा जिल्ह्याने त्यांची पाठराखण केली. मात्र, त्यांनी जिल्ह्याला काहीच दिले नाही. आपला वापर करून स्वतःचा स्वार्थ त्यांनी साधला. अशी टीका त्यांनी केली आहे.