दाऊदसह अनेक डॉन भारत सोडून पळाले मात्र अरुण गवळी एकमेव डॉन होता, ज्याने मुंबई सोडली नाही 

मुंबई – तसं पाहिलं तर मुंबई (Mumbai) ही कष्टकऱ्यांची आणि मिल कामगारांची कर्मभूमी, त्यांच्या कुटुंबाला आपल्यात सामावून घेणारं एक शहर. पण, काळ लोटत गेला आणि या शहराची मायानगरी झाली. ही मायानगरी होत असतानाच मुंबईत काही अशा टोळ्यांचा जन्म झाला ज्यांच्या अस्तित्वामुळे परिस्थितीच बदलली आणि रक्तपातही झाला. गँगवॉर(Ganag War) , बॉम्ब हल्ले (Bomb Attack) , दंगल आणि शहरावर राज्य करणारे डॉन हे सर्व या शहराने पाहिलंय. अशा या शहराच्या इतिहासातील किंबहुना शहरातील गँगवॉरच्या इतिहासातील एक नाव म्हणजे अरुण गुलाब गवळी उर्फ ‘डॅडी’(Daddy).

जेव्हा 1990 मध्येमुंबईजेव्हा टोळीयुद्ध जोरात सुरू होते, तेव्हा सर्व गुंडांमध्ये अरुण गवळी एकमेव होता, ज्याने मुंबई सोडली नाही. मुंबईतील एका सामान्य चाळीत राहणारा मुलगा शहरावर राज्य करू लागतो. संपूर्ण महाराष्ट्रयामध्ये तो डॅडी या नावाने प्रसिद्ध होतो. गवळीच्या जीवनावर मराठी आणि हिंदीत चित्रपटही तयार झाला आहे. गवळी जवळपास तीन दशके अंडरवर्ल्डच्या जगात राहिला. गवळीवर खून, खंडणी, अपहरण असे डझनभर गुन्हे दाखल आहेत.

लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार  अरुण गवळी यांचा जन्म १७ जुलै १९५५ रोजी अहमदनगर जिल्ह्यात झाला. त्यांचे बालपणीचे नाव अरुण गुलाबराव अहिर होते. गवळी डॉन बनण्याची कहाणी 1970 च्या दशकात सुरू होते, जेव्हा मुंबईची कापड गिरणी बंद पडली होती. लाखो मजूर बेरोजगार झाले, उपासमार वाढली. त्यानंतर चाळीत राहणारे मजूर अंडरवर्ल्डच्या आहारी जाऊ लागले. त्यातलाच एक अरुण गवळी. पैसे कमावण्यासाठी गवळीने शॉटकटचा अवलंब केला आणि आठवड्याची वसुली सुरू केली. वसुली करत असताना गवळी रामा नाईक याने बाबू रेशीमसह बीआर टोळी तयार केली. रमा नाईक (Rama Naik) आणि गवळी दोघेही चांगले मित्र होते. रमा  नाईकलाअंडरवर्ल्डच्या व्यवसायाची चांगली माहिती होती, त्यामुळे गवळी त्यांचे म्हणणे ऐकून घेत असे.

1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटापूर्वी दाऊद भारत सोडून दुबईला गेला होता. दाऊद दुबईला गेल्यानंतर त्याची टोळीही फुटू लागली. बॉम्बस्फोटांमुळेच दाऊद आणि त्याचा उजवा हात छोटा राजन वेगळे झाले. छोटा राजनही मुंबईहून मलेशियाला गेला. अशाप्रकारे या सर्वांना सोडून गेल्याचा फायदा गवळीला मिळाला. बहुतेक अंडरवर्ल्ड डॉन मुंबईतून पळून गेले होते. यानंतर गवळीआणि अमर नाईकमध्ये टोळीयुद्ध सुरू झाले. गवळीचा शार्पशूटर रवींद्र सावंत याने एप्रिल 1994 मध्ये अमर नाईकचा भाऊ अश्विन नाईक यांच्यावर हल्ला केला पण तो फरार झाला. त्यानंतर ऑगस्ट 1996 मध्ये मुंबई पोलिसांनी गवळीचा शत्रू अमर नाईक याला चकमकीत ठार केले आणि त्यानंतर अश्विन नाईकलाही अटक करण्यात आली. तेव्हापासून मुंबईवर गवळीची राजवट सुरू झाली.

अंडरवर्ल्डवर वर्चस्व गाजवणाऱ्या गवळीला माहीत होते की एक दिवस पोलिस त्याच्यावर नक्कीच कारवाई करतील. अशा परिस्थितीत त्यांना राजकारणाचा आश्रय घेणे सर्वात सोपे वाटले. यामुळे त्यांनी 2004 साली अखिल भारतीय सेना या नावाने पक्ष स्थापन केला. 2004 च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत गवळी यांनी आपले अनेक उमेदवार उभे केले आणि स्वतः चिंचपोकळी मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि जिंकली.एक वेळ अशी होती जेव्हा शिवसेनेने गवळी यांना पाठिंबा दिला होता. मात्र काही कारणास्तव शिवसेना आणि गवळी यांच्यात दुरावा निर्माण झाला होता.  पुढे 2008 मध्ये गवळीने शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्या झाली. या हत्येसाठी गवळीने 30 लाखांची सुपारी घेतली होती. 2008 मध्ये शिवसेनेच्या नगरसेवकाच्या हत्येप्रकरणी गवळीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.