‘ज्यांचे संबंध दाऊदशी त्यांच्या बरोबर आपले शेठजी बिर्याणी खाऊन आलेत’

मुंबई – मनी लाँड्रिंगच्या (money laundering case) आरोपांचा सामना करत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (ED on Nawab Malik) यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. विशेष न्यायालयाने नवाब मलिकविरुद्धच्या खटल्याची सुनावणी करताना ईडीने सादर केलेल्या आरोपपत्राची दखल घेतली. यावर कोर्टाने नवाब मलिक यांचे डी-गँगशी (d company) संबंध होते असं निरीक्षण नोंदवलं आहे.

नवाब मलिक (Nawab Malik) यांचा थेट मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्यात सहभाग होत असेही न्यायालयाने म्हटले आहे. याशिवाय नवाब मलिकांनी गोवावाला कंपाऊंड मिळवण्यासाठी कट रचल्याचा ठपका ईडीने ठेवला आहे. मंत्री नवाब मलिक यांनी हसीन पारकरसोबत वारंवार बैठका घेतल्या आणि मनी लाँड्रिंग केलं असं निरीक्षणही कोर्टाने नोंदवलं आहे.

दरम्यान, न्यायालयातील या घडामोडींवरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले असून सत्ताधाऱ्यांची मलिक यांच्यामुळे चांगलीच गोची झाली आहे. दरम्यान, वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत राहणाऱ्या शिवसेनेच्या नेत्या दिपाली सय्यद (Shiv Sena leader Deepali Syed) यांनी  या विषयावर देखील भाष्य केले आहे. ज्यांचे संबंध दाऊदशी त्यांच्या बरोबर आपले शेठजी बिर्याणी खाऊन आलेत. दाऊदला भारतात आणु अशी घोषणा देऊन सरकार मधे आलेत. चिरीट तोम्मया बापाने माती खाली म्हनुन गावावर नाव ठेवणे हे बर नव्हे. असं त्यांनी म्हटले आहे.