पक्ष सोडून गेलेले परत येणार असतील तर बाजूला जातो : संजय राऊत

पंढरपूर : शिवसेनेत फुट पडल्यावर आता दोन्ही गटांनी आपले वेगवेगळे संसार सुरु केले आहेत. मात्र या फुटीला जबाबदार खासदार संजय राऊत (Sanjay raut) असल्याचं वारंवार सांगितले जात असते. यातच आता माझ्या वक्तव्याने जर ते बाजूला गेले मी बाजूला जातो. ते परत येणार आहेत का? असं वक्तव्य त्यांनी केलं. मात्र पत्रकारांनी जेंव्हा त्यांना पुन्हा हाच प्रश्न विचारला तेंव्हा मात्र त्यांनी ऑन कॅमेरा घूमजाव केला. आज संजय राऊत आपल्या कुटुंबासमवेत विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूर येथे आले असता ते माध्यमांशी बोलत होते .

एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार, गद्दारी करणाऱ्या छगन भुजबळ यांचा यापूर्वी मुंबई आणि नाशिकमधून आम्ही पराभव केलाय आता त्यांना येवल्यातून पराभूत करू असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. राज ठाकरे आमचे मित्र असले तरी मोदी आणि शहा यांच्या दडपशाही विरोधात सर्वांनी एकत्र येणे गरजेचे असून अनेक दगडावर पाय ठेऊन आता कोणालाही राजकारण करता येणार नाही असा टोलाही राऊत यांनी राज ठाकरे यांना लगावला आहे.पानसे हे चर्चा करण्यासाठी योग्य व्यक्ती नसून एका फोनवर राज आणि उद्धव ठाकरे बोलू शकतात असे राऊत यांनी सांगितले.