विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन येत्या 17 जुलै ते 4 ऑगस्ट दरम्यान मुंबईत होणार

Mumbai – महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन येत्या 17 जुलै ते 4 ऑगस्ट दरम्यान मुंबईत होणार आहे. याबाबतची घोषणा विधानसभा कामकाज सल्लागार समितीच्या काल झालेल्या बैठकीत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी, तर विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत विधानपरिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी केली.

विधानभवनात पार पडलेल्या या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह विधानसभा सदस्य उपस्थित होते. विधिमंडळाच्या शतकोत्तर प्रवासाच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळ वाटचालीचं दस्ताऐवजीकरण करण्याचं फडणवीस यांनी यावेळी सूचित केलं. तर विधिमंडळाच्या कामकाजातून महत्त्वपूर्ण घटना, प्रसंगांना उजाळा देणाऱ्या उपक्रमांचं आयोजन करण्याची सूचना गोऱ्हे यांनी मांडली. अधिवेशनाच्या 19 दिवसांच्या कालावधीत प्रत्यक्ष 15 दिवस कामकाज होणार आहे.