Uddhav Thackeray | मी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यावर महाराष्ट्रातल्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होतं

Uddhav Thackeray | लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत असून धाराशीव लोकसभेतील तुळजापूर येथील ‘जनसंवाद’ मेळाव्यात पक्षप्रमुख शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपवर टीका करत पुन्हा एकदा भावनिक राजकारण करायला सुरुवात केली आहे.

मी तुमच्या म्हणजेच जनतेच्या न्यायालयात आलोय, मला तुम्ही न्याय द्याल ना? असा सवाल त्यांनी यावेळी केला.ते म्हणाले, मी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यावर महाराष्ट्रातल्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होतं, हे पाणी हीच माझी ताकद आहे.

जेव्हा अन्नदाता विचारतोय, ‘आम्ही खायचं काय?’ तेव्हा तरी मोदीजी, तुम्ही माझ्या शेतकऱ्याची विचारपूस करायला आलात का? बंदूका रोखणारं सरकार तुम्हाला हमीभाव देईल, असं वाटतं का?अरे, मी तर मोडणार नाहीच, पण तुम्हाला आम्ही वाकवल्याशिवाय राहणार नाही! ‘अब की बार भाजप तडीपार‘ हा नारा यशस्वी झाल्यावरच अच्छे दिन येणार! असे ते म्हणाले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Sunil Shelke | …अन्यथा मी राज्यभर सांगणार की पवार साहेबांनी माझ्यावर खोटे आरोप केले, सुनिल शेळकेंचा इशारा

Amit Shah | अमित शाह हे शेपूट घालणारे गृहमंत्री; उद्धव ठाकरे यांची सडकून टीका

Sharad Pawar | पक्ष स्थापनेपासून आम्ही विचारधारा कधीच बदलली नाही; शरद पवार यांचा दावा