आधीच हार्दिकच्या फिटनेसची चिंता, आता ‘हा’ हुकमी एक्का देखील होऊ शकतो वर्ल्ड कपच्या बाहेर ?

Cricket, India Team, Worldcup

नवी दिल्ली : टी-२० विश्वकप स्पर्धेला आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. सर्वच देशाने आपले १५ सदस्यीय संघ जाहीर देखील केलेत. पण अशात भारतीय संघासाठी एक वाईट बातमी समोर येत आहे. आधीच हार्दिक पांड्याच्या फिटनेस बद्दल चिंता सतावत असताना सध्या कोलकाता नाईट रायडर्सकडून (केकेआर) आयपीएलमध्ये खेळत असलेला ‘मिस्ट्री स्पिनर’ वरुण चक्रवर्तीच्या गुडघ्याची दुखापत पुन्हा एकदा समोर आली आहे.

वरुण चक्रवर्तीला आगामी टी -20 विश्वचषकात भारताचा प्रमुख गोलंदाज म्हणून पहिले जात आहे, परंतु बीसीसीआयच्या वैद्यकीय टीमला तामिळनाडूच्या या फिरकीपटूवर मेहनत घ्यावी लागणार आहे. 10 ऑक्टोबरपर्यंत भारतीय संघात बदल केले जाऊ शकतात, परंतु गुडघ्यांची समस्या असूनही वरुणच्या गोलंदाजीचा विचार करता तो खेळणार हे निश्चित आहे.

वरुणच्या गुडघ्यांची स्थिती फारशी चांगली नाही. त्याच दुखण वाढत आहे, पण जर टी 20 विश्वचषक नसता तर भारतीय संघ व्यवस्थापनाने त्याला खेळवण्याचा धोका पत्करला नसता. असे बीसीसीआय मधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे.

हे ही पहा:

https://www.youtube.com/watch?v=5wWKfxFFi5c

Previous Post
Nana Patole

काँग्रेसला संपवण्याचा विचार करणाऱ्यांना जनतेचे चोख उत्तर – नाना पटोले

Next Post
Kothimbir

कोथिंबीरीची लागवड करून असे बना लखपती!

Related Posts

येत्या चार वर्षात देशातले दोन कोटींपेक्षा जास्त शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळतील – Amit Shah

Amit Shah On Organic farming – येत्या चार वर्षात देशातले दोन कोटींपेक्षा जास्त शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळतील असा…
Read More

मुंबई भाजपतर्फे महाविकास आघाडीविरोधात ‘नाक घासो’ आंदोलन

BJP Protest In Mumbai: ‘नको खोटी भाषा, गुंडाळा शरद पवारांचा गाशा…आपला नातू तुपाशी दुसऱ्यांची पोरं उपाशी…विरोधकांची हुलाहुल, विद्यार्थ्यांची…
Read More

सरकारचा आणि सत्तेचा विचार हा जनतेसाठी झाला पाहिजे – छगन भुजबळ

नांदेड :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार (Sharad Pawar) हे दूरदृष्टी असलेलं नेतृत्व असून देशातील प्रत्येक समाजाला…
Read More