‘पक्ष, पक्षप्रमुखपद आणि धनुष्यबाण हे चिन्ह वाचवायचं असेल तर शिंदेंसोबत तडजोड करण्याला पर्याय नाही’

Pune  –  शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पक्षनेतृत्वाच्या विरोधात बंडाचा झेंडा हाती घेतला आहे. एकनाथ शिंदे, शिवसेनेच्या ३४ सोबतच ७ अपक्ष अशा एकुण ४१ आमदारांसह गुवाहाटीमध्ये (Guwahati) आहेत. शिंदे यांनी दिलेल्या दणक्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.विशेष म्हणजे महाविकास आघाडीला (MVA) पाठींबा देणारे अनेक अपक्ष सुद्धा आता भाजप (BJP) नेत्यांच्या गाठीभेटी घेऊ लागले आहेत.

राज्यात राजकीय भूकंप घडवणाऱ्या शिवसेनेतील आजवरच्या सर्वात मोठ्या बंडानं ठाकरे सरकार (Thackeray Gov) अडचणीत आलं आहे. याचवेळी एकनाथ शिंदे यांच्यासोबत अनेक आमदार असल्याची चर्चा आहे. शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांची भूमिकाही आता समोर आली आहे. त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबरचं सरकार अमान्य असल्याचं कळत आहे भाजपसोबत (BJP) जाण्यास हे नेते इच्छुक आहेत अशी भूमिका बंडखोर आमदारांनी घेतल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, या सर्व घडामोडींवर आता सामाजिक कार्यकर्ते आणि विचारवंत विश्वंभर चौधरी (Vishwambhar Chaudhary) यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले,  फार मोठ्या कोंडीत सापडले आहेत. पक्ष, पक्षप्रमुखपद आणि धनुष्यबाण हे चिन्ह वाचवायचं असेल तर शिंदेंसोबत तडजोड करण्याला पर्याय दिसत नाही. राजकारणात असे पेच येतात ते काही तरी गमावून सोडवावे लागतात. शिवसेनाप्रमुखपद की मुख्यमंत्रीपद याचा निर्णय उद्धवजींना घ्यायचा आहे. ही अभूतपूर्व आणि तितकीच दुर्दैवी कोंडी आहे पण दुसरा पर्याय दिसत नाही. असं ते फेसबुक पोस्टमध्ये म्हणाले आहेत.