मी जे बोललो ते सत्यच, बाकीचं योग्य वेळी बोलेन; पहाटेच्या शपथविधीबाबात फडणवीसांचं पुन्हा वक्तव्य

Pune – २०१९ साली विधानसभा निवडणूक झाल्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार (MVA ) होण्यासाठी हालचाली वाढल्या होत्या. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Devendra Fadnavis and Ajit Pawar) यांनी पहाटे शपथ घेत काही तासांचं सरकार स्थापन केलं होतं. यानंतर एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणावर आता देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

पहाटेच्या शपथविधीवेळी जे सरकार स्थापन झालं होतं त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची संमती होती, असं स्पष्ट विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. या आरोपांवर स्वतः त्यांनी अतिशय संतप्त अशी प्रतिक्रिया दिली. “मला वाटलं देवेंद्र हा सुसंस्कृत माणूस आहे. सभ्य माणूस आहे. असत्याचा आधार घेऊन ते अशाप्रकारचं स्टेटमेंट करतील असं मला कधी वाटलं नाही”, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.

दरम्यान, आता यानंतर फडणवीस यांनी पुन्हा एकदा एक लक्ष्यवेधी वक्तव्य केले आहे. मी जे बोललो ते 100% सत्य, उरलेलं वेळ आल्यावर बोलेन; असं फडणवीस म्हणाले. पहाटेचा शपथविधीबीबत जास्त बोलायचंय पण योग्य वेळची वाट बघतो, असही फडणवीस म्हणाले.