हे लोक पाकिस्तानमधून…; आरपीएफ जवानाने जयपूर-मुंबई रेल्वेत गोळ्या झाडण्यामागचे कारण आले समोर
महाराष्ट्रातील पालघरमध्ये जयपूर-मुंबई एक्स्प्रेस ट्रेनमध्ये (Jaipur Mumbai Express) एका RPF कॉन्स्टेबलने त्याच्या वरिष्ठ ASI वर अंदाधुंद गोळीबार केला. सोमवारी घडलेल्या या घटनेत गोळी लागल्याने एएसआय आणि अन्य ३ प्रवाशांचा मृत्यू झाला. चेतन सिंह नावाच्या आरपीएफ कॉन्स्टेबलने गोळीबार केला, ज्याला पोलिसांनी मीरा रोड येथून अटक केली आहे. आता आरपीएफ जवानाने गोळीबार करण्याचे कारण समोर आले आहे.
रेल्वे सुरक्षादलाचे कॉन्स्टेबल घनश्याम आचार्य हे कॉन्स्टेबल चेतन सिंह आणि सहाय्यक उप-निरीक्षक टीकाराम मीना यांच्यासोबत रविवारी रात्री सुफरफास्ट रेल्वेत ड्युटीवर होते. त्यांनी या घटनेसंबंधी संपूर्ण माहिती दिलेली आहे.
आचार्य यांनी सांगितलं की, जयपूर-मुंबई रेल्वेत एक सहकारी आणि तीन प्नवाशांना गोळी मारणाऱ्या आरपीएफ कॉन्स्टेबल चेतन सिंह याने घटनेच्या काही तासापूर्वी आपल्या सहकाऱ्यांना अस्वस्थ वाटत असल्याचे सांगितले होते. आचार्य यांनी सांगितलं की, ते टीकाराम मीना (५८), कॉन्स्टेबल चेतन सिंह (३३), आणि कॉन्स्टेबल नरेंद्र परमार (५८) यांच्यासोबत ड्युटीवर होते. ते जवळपास २.५३ वाजता सुरत ते मुंबई जाणाऱ्या रेल्वेमध्ये चढले. चेतन सिंह आणि टीकाराम मीना एसी कोचमध्ये ड्युटीवर होते, तर आचार्य आणि परमार स्लीपर कोचमध्ये होते.