आता राज्यात किराणा दुकानात वाईन मिळणार ! हर्बल वनस्पती म्हणून मियाँचा गांजा तेवढा राहिला!

मुंबई – राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातल्या सुपर मार्केटमध्ये आता वाईनची विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे. हा प्रस्ताव आधी विचाराधीन होता. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत याबद्दलचा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, या निर्णयामुळे राज्य सरकार टीकेची धनी बनले आहे. शिवरायांच्या महाराष्ट्राला मद्यराष्ट्र बनवले जात असल्याचे सांगत विरोधकांसह सामाजिक कार्यकर्ते आणि सुजाण नागरिक या निर्णयावर टीका करत आहेत.महत्वाचं म्हणजे सोशल मिडीयावर देखील सरकारच्या या निर्णयाविरोधात संतापाची लाट उसळली आहे.

दरम्यान, आता या मुद्द्यावरून भाजप नेते शिवराय कुळकर्णी यांनी देखील सरकारवर खोचक शब्दात टीका केली आहे. आता राज्यात किराणा दुकानात वाईन मिळणार ! हर्बल वनस्पती म्हणून मियाँचा गांजा तेवढा राहिला !असं म्हणत त्यांनी सरकारला चिमटा काढला आहे.