वटपौर्णिमेबाबतच्या वक्तव्यावरून रुपाली चाकणकर यांना मनसेचा टोला

पुणे – वटपौर्णिमेनिमित्त अनेक महिला वडाला फेरे मारुन पुढचे सात जन्म हाच पती मिळू दे, अशी प्रार्थना करतात. पण मी लग्न झाल्यापासून एकदाही वडाला फेरे मारले नाहीत. माझ्या सासरच्या मंडळींनी देखील मला कधी आग्रह केला नाही वा माझ्या नवऱ्याने पण कधी तसा हट्ट केला नाही. याबाबत मी भाग्यवान आहे, असं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (State Women’s Commission Chairperson Rupali Chakankar) यांनी म्हटलं आहे.

आपल्या समाजाला सत्यवानाची सावित्री (Savitri of Satyavana) फार लवकर समजली, परंतु जोतिबाची सावित्री अजून समजली नाही, असंही रुपाली चाकणकर यांनी म्हटलंय. हेरवाडच्या धर्तीवर खडकवासला धायरीसह एकूण 29 ग्रामपंचायतींनी विधवा प्रथा बंदी (Widowhood ban) करणारा ठराव मंजूर केला. यावेळी आयोजित कार्यक्रमात महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर बोलत होत्या. समाजात अनेक अनिष्ट प्रथा परंपरा (Undesirable practice tradition प्रचलित असून राज्यातील प्रत्येक गावाने विधवा प्रथा मुक्तीचा ठराव (Resolution on Widowhood) करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असं आवाहन त्यांनी केलं.

दरम्यान, चाकणकर यांनी केलेल्या वटपौर्णिमेबाबतच्या वक्तव्यावर मनसेचे नेते योगेश खैरे यांनी याच मुद्द्यावर भाष्य करत चाकणकर यांना टोला लगावला आहे. ते म्हणाले, आपले सण, परंपरा आणि संस्कृती जपणं आणि वाढवणं हे आपलं कर्तव्य आहे…. वटपौर्णिमा म्हणजे आपल्या माणसांना जपण्यासाठी काहीही करण्याची तयारी असण्याचा संदेश देणारा सण आहे…! आणि चाकणकर ताई…. देशाला ‘सावित्रीबाई’ कळल्या म्हणूनच सगळ्या क्षेत्रात महिला ताठमानेने उभ्या आहेत !!असं खैरे यांनी म्हटले आहे.