Abhishek Ghosalkar Firing | ‘राज्याचे गृहमंत्री पक्ष फोडण्यात व्यस्त , त्यांना कायदा -सुव्यवस्थेकडे लक्ष द्यायला वेळ नाही’

Abhishek Ghosalkar Firing  : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar Firing ) यांच्यावर काल मुंबईतील दहिसर इथं गोळ्या झाडण्यात आल्या; त्यानंतर खासगी रुग्णालयात दाखल केलं असता त्यांना मृत घोषित करण्यात आलं. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या मॉरिस नोरोन्हो याने अभिषेक यांच्यावर गोळ्या झाडल्या. अभिषेक आणि मॉरिस फेसबुकवर लाईव्ह असताना ही घटना घडली. त्यानंतर मॉरिसनेही आत्महत्या (Morris commits suicide) केली. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

ठाकरे गटाचे नेते आणि माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे अभिषेक घोसाळकर हे सुपूत्र होत. विनोद घोसाळकर हे २००९ ते २०१४ पर्यंत आमदार होते. दरम्यान, या घटनेने महाराष्ट्र हादरला आहे. या मुद्द्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप देखील होत आहेत.

दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर निशाणा साधला आहे.अंजली दमानिया यांनी टीव्ही ९ मराठीशी बातचीत केली. त्या म्हणाल्या, काल संध्यकाळी घडलेली घटना धक्कादायक आहे. राज्यात चालू असलेलं राजकारण आणि अशा प्रकारच्या घटना पाहून प्रश्न पडतोय की, आपल्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राहिली आहे का? हत्या आणि गोळीबार करण्यासाठी या लोकांकडे बंदुका कुठून येतात, कशा येतात? या लोकांवर कोणाचाच वचक दिसत नाही. दिवंगत गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी, गावागावांमधील भांडणं थांबवण्यासाठी ‘तंटामुक्त गाव’ हे अभियान राबवलं होतं. तसंच अभियान या सत्ताधाऱ्यांनीही आपसांत राबवण्याची गरज आहे. राज्याचे गृहमंत्री पक्ष फोडण्यात व्यस्त आहेत. त्यांना कायदा आणि सुव्यवस्थेकडे लक्ष द्यायला वेळ नाही.

महत्वाच्या बातम्या : 

Vijay Vadettiwar | सरकारी तिजोरी स्वच्छ करण्याच्या मंत्र्यांमधील स्पर्धेला आता ऊत आलाय

Maharashtra Politics | पक्ष चोराचोरीत दंग असलेल्या महायुती सरकारला शेतकऱ्यांचा विसर

Maharashtra Kranti Sena | महायुतीची ताकत वाढली; आणखी एका पक्षाची मिळणार साथ