Eknath Shinde | मोदीजी को हराना मुमकिन ही नहीं नामुमकिन है. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास

Eknath Shinde | पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी राम मंदिराची उभारणी केली. कलम 370 हटविले. मागील दहा वर्ष एक ही सुट्टी न घेता पंतप्रधान मोदी यांनी काम केले. त्यांचा जन्म राष्ट्रनितीसाठी झालाय. मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यास जनता आतूर झाली आहे. मोदीजी यांना हरवणे सोपे नाही तर केवळ अशक्य आहे, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी व्यक्त केला. आईचे दुःख बाजूला ठेवत देशसेवा करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठे आणि दुसऱ्या बाजूला आईचा पदर पकडून राजकारण करणारा राहुल गांधी कुठे हा फरक जनतेला ओळखला आहे, अशी टीका त्यांनी यावेळी केली.

ठाणे टेभी नाका येथील आनंद आश्रममध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत माजी खासदार संजय निरुपम आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.

पुढे एकनाथ शिंदे म्हणाले, मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर आहे. त्यादृष्टीने इतकी वर्ष सत्तेत असणाऱ्यांनी या शहराचा विकास करायला पाहिजे होता. मात्र दुर्दैवाने त्यांनी मुंबईकरांचा विचार केला नाही. त्यांनी फक्त स्वतःचा विचार केला, असा घणाघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठा गटावर केला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Narendra Modi | “घाबरू नका, पळू नका”, राहुल गांधींना रायबरेलीतून उमेदवारी मिळाल्यानंतर नरेंद्र मोदींचा खोचक टोला

Murlidhar Mohol | पुणे रेल्वे स्थानकाचा होणार विस्तार अन्य शहरांशी वाढणार कनेक्टिव्हिटी

Chitra Wagh | मोठ्या ताईंचा एकेक व्हिडिओ पाहून हसू येतं, त्यांचं मानसिक संतुलन ढासळलंय