Amit Shah | आज अख्खं जग भारताच्या यशोगाथेचं गुणगान करत आहे; अमित शाह यांचा दावा

Amit Shah : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वात गेल्या 10 वर्षात देशांतर्गत सुरक्षेचं मजबूत जाळं उभारण्यात भारत यशस्वी झाल्याचं केंद्रिय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी म्हटलं आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच धोरणात्मक बदल घडवून अंतर्गत सुरक्षेबाबतची हमी घेण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले गेले असं शहा म्हणाले.

भारताच्या भविष्यकालीन सुरक्षेबाबतच्या व्याख्यानात ते काल नवी दिल्लीत बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते परराष्ट्र धोरण अहवालाचं प्रकाशन करण्यात आलं. आज अख्खं जग भारताच्या यशोगाथेचं गुणगान करत आहे. भारताचा विश्वमित्र म्हणून विचार करत आहे असं त्यांनी सांगितलं. सरकारनं परराष्ट्र धोरणासारखा कठीण विषयही सामान्य जनतेपर्यंत पोहोचवल्याचं या अहवालातून दिसून येत असल्याचं त्यांनी नमूद केलं.

महत्वाच्या बातम्या –

भाजप आमदाराच्या गोळीबारामुळे आणि मुख्यमंत्र्यांवरील आरोपांमुळे महाराष्ट्राची मान शरमेने खाली

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस दोघे मिळून मराठा आणि ओबीसी समाजाला एकमेकांविरोधात झुंझवत आहेत – Nana Patole

Atif Aslam | “पाकड्यांकडून गाणं रेकॉर्ड करून दाखवाच”, मनसेचं बॉलिवूडकरांना थेट आव्हान