‘काँग्रेसला अवदसा आठवली, योध्यांचाही अपमान केला… सगळी गद्दारांची फौज’

Mumbai – विधानपरिषद निवडणुकीसाठी 285 आमदारांचं मतदान पूर्ण झालं आहे. पाच वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून आपापल्या उमेदवारांचा कोटा पूर्ण झाला आहे. महाविकास आघाडीकडून तिसऱ्या क्रमांकाची मतं काँग्रेसच्या भाई जगताप यांना मिळाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

काँग्रेसने लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या मतदानाला आक्षेप घेतला आहे. मतदान करताना मतपत्रिकेवर सही केली पण पसंतीची मत देताना दुसऱ्याची मदत घेतली असा आरोप काँग्रेसने भाजपच्या या दोन मतांवर आक्षेप घेतला आहे. गुप्त मतदान असताना दुसऱ्यांची मदत घेतल्याने ही हरकत घेतली आहे.

दरम्यान, कॉंग्रेसच्या या खेळीवर आता भाजप खासदार अनिल बोंडे यांनी प्रहार केला आहे. ते म्हणाले, काँग्रेसला अवदसा आठवली, योध्यांचाही अपमान केला… काँग्रेसला निष्ठावंतांची किंमतच कशी कळणार? सगळी गद्दारांची फौज… असं बोंडे यांनी म्हटले आहे.