‘प्रकाश आंबेडकर यांनी यापुढे काळजी घ्यावी, खंजीरापासून सुरक्षेसाठी चिलखत घालून फिरावे…’

मुंबई: राज्याच्या राजकीय पटलावर शिवशक्ती आणि भीमशक्ती पुन्हा एकदा एकत्र आली आहे असून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांची शिवसेना आणि प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या वंचित बहुजन आघाडीत (VBA) युती झाली आहे. प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे (Prakash Ambedkar and Uddhav Thackeray) यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा केली.  महाराष्ट्रात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी आगामी सर्व नागरी निवडणुका एकत्रित लढवणार आहेत.  त्यामुळे भाजप आणि शिंदे गटासाठी मोठं आव्हान उभं राहणार आहे असं सांगितले जात आहे.

दरम्यान, या घडामोडींवर आता भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी भाष्य केले आहे. प्रकाश आंबेडकर यांनी यापुढे काळजी घ्यावी, खंजीरापासून सुरक्षेसाठी चिलखत घालून फिरावे… असा खोचक सल्ला त्यांनी प्रकाश आंबेडकर यांना दिला आहे.