औरंगजेबाच्या दोन राण्यांना मंदिराजवळील  भुयारात नेऊन भ्रष्ट केलं म्हणून…; नेमाडेंचा अजब शोध 

Bhalchandra Nemade :  ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक भालचंद्र नेमाडे हे गेल्या काही दिवसांपासून लेखक कमी आणि वादग्रस्त वक्तव्य करणारे महाशय म्हणून समोर येत आहेत. नुकतेच त्यांनी  चक्क स्वराज्याचा शत्रू असणाऱ्या औरंगजेबाचे कौतुक केले. औरंगजेब हा हिंदू द्वेष्टा नव्हता असा दावा देखील या महाशयांनी केला आहे.

सोबतच औरंगजेबच्या दोन हिंदू राणींना काशी-विश्वेश्वर मंदिरातील पंड्यांनी मंदिराजवळील भुयारात नेऊन भ्रष्ट केलं होतं. औरंगजेबाच्या दोन्ही बायकांना भ्रष्ट करण्यात आलं म्हणून त्याने मंदिर फोडलं, असा अजब दावा नेमाडे यांनी केला आहे. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

नेमकं काय म्हणाले नेमाडे ?

औरंगजेबाच्या दोन राण्या हिंदू होत्या, त्यावेळी हिंदू मुसलमान भेद नसायचा. हिंदू राण्या सगळ्यांच्याच असायच्या. तुम्हाला माहित आहे शाहजानची आई हिंदू होती. अकबराची बायको हिंदू होती. औरंगजेबाच्या दोन हिंदू राण्या काशी विश्वेश्वराला गेल्या. त्या आल्याच नाहीत परत. छावणीतले लोक म्हणाले की माहित नाही. मग औरंगजेबाला हे समजलं की तिथले जे पंडे होते ते तिथे आलेल्या बायकांना एका भुयारात नेऊन भ्रष्ट करायचे. असे पंडे असतील तर त्यांना मारलंच पाहिजे, या विचाराने त्याने काशी विश्वेवर मंदिर फोडलं. त्यानंतर इतिहासकारांनी अशी नोंद घेतली की औरंगजेब हिंदू द्वेष्टा होता. औरंगजेब हिंदू द्वेष्टा नव्हता. पंडे हे काही हिंदू होते का? बायकांना भ्रष्ट करणारे? पुस्तकं वाचूनच हे कळतं. मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालायात तुम्ही आलात पुस्तकं वाचलीत की तुम्हाला खरं काय ते कळेल.