‘उद्धव ठाकरे तुम्ही तर फुटक्या पायाचे… पनवती.. वसुलीबाज…’

मुंबई – माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर पातळी सोडून टीका केली आहे. फडणवीस म्हणजे नागपूरला लागलेला कलंक आहे असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर घणाघाती टीका केली आहे. यासोबतच त्यांनी भारतीय जनता पक्षावर विश्वासघात केल्याचा आरोप केला. यासोबतच ठाकरेंनी आपल्या भाषणात जहरी टीका भाजपवर केली.

दरम्यान, या टीकेला भाजप आमदार प्रवक्ते राम कदम (Ram Kadam) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. उद्धव ठाकरे तुम्ही तर फुटक्या पायाचे … पनवती.. वसुलीबाज… आहात अशी टीका कदम यांनी केली. घरकोंबडा.. आळशी म्हणून परिचित असलेले आपण … जेव्हा मुख्यमंत्री म्हणून आलात corona घेऊन आलात …खरे कलंक आपण आहत ..आम्ही सोडली कधी पातळी मात्र… आता नाही थांबणार असा इशारा देखील टीका करताना राम कदम यांनी दिलाय.

उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?
“देवेंद्र फडणवीस हे नागपूरला लागलेला कलंक आहे. आता सांगत आहेत, उद्धव ठाकरेंनी पाठीत खंजीर खुपसला, म्हणून आम्ही यांच्याबरोबर गेलो. पहिलं उद्धव ठाकरेच्या पाठीत खंजीर कुणी खुपसला? २०१४ ते २०१९ तुमच्याबरोबर सत्तेत होतो. २०१४ साली शिवसेनेनं नाहीतर, तुम्ही युती तोडली. तेव्हा मी काँग्रेसबरोबर गेलो नव्हतो. मी तिथेच होतो आणि तिथेच आहे. वार करणारी तुमची अवलाद आहे,” असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं.