भाजपाला चार राज्यात मिळालेला विजय हा विकासाचा विजय आहे : मुळीक

पुणे – भारतीय जनता पार्टी कायम विकासाचे राजकारण करत असून त्याचे फळ आज चार राज्यात मिळालेल्या विजयात दिसून येते. भारतीय जनता पार्टी चे नेतृत्व कायम अंत्योदया साठी कार्यरत आहे आणि केंद्र आणि राज्य सरकारांच्या योजना घराघरात पोचून त्याचा सर्वसामान्य नागरिकांना फायदा झाला म्हणूनच भारतीय जनता पार्टीला सर्व जनतेचा व्यापक पाठिंबा मिळत आहे. त्याचे चित्र आज पाच राज्यांच्या निवडणूक निकालांवरून स्पष्टपणे दिसत आहे असे मत भाजपा शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी व्यक्त केले.

आज लागलेल्या पाच राज्यांच्या निवडणूक निकालात भाजपाला मिळालेल्या अत्यंत उत्साहवर्धक यशाचा आनंद साजरा करायला भाजपा पुणे शहर कार्यालय येथे  भाजपा कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. यावेळी नागरिकांना कार्यकर्त्यांनी लाडू वाटून आनंद साजरा केला.

यावेळी शहर संघटन सरचिटणीस राजेश पांडे गणेश घोष आणि इतर अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बोलताना माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेचा असलेला विश्वासच या निकाला मधून दिसतो. उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कणखर नेतृत्वामुळे जनतेने भाजपला भरभरून मते दिली असेही त्यांनी सांगितले.