आपापल्या पणजोबाच्या पुण्याईवर जगणारे, देशासाठी २ निरुपयोगी जीव- चित्रा वाघ

Mumbai: काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे राजकारण तापले आहे. एकीकडे त्यांच्या सावरकर विरोधी वक्तव्यामुळे त्यांच्यावर टीका होत असताना महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी (Tushar Gandhi) यांनी त्यांचे समर्थन केले आहे. यावरून आता भाजपा नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी राहुल गांधी आणि तुषार गांधी यांचे कान टोचले आहेत. चित्रा वाघ यांनी त्या दोघांना देशासाठी निरुपयोगी जीव म्हणत टीकास्त्र सोडले आहे.

राहुल गांधी यांच्या सावरकरांबद्दलच्या वक्तव्याच्या समर्थनार्थ बोलताना तुषार गांधी म्हणाले की, “हे सत्य आहे वीर सावकर इंग्रजांचे मित्र होते. त्यांनी तुरुंगातून बाहेर निघण्यासाठी इंग्रजांची क्षमा मागितली होती. आम्ही हे विधान कोणत्या व्हॉट्सअप युनिव्हरसिटीतून घेतले नसून, इतिहासात याचे पुरावे आहेत.”

याच भाष्यावरून भाजपाच्या चित्रा वाघ यांनी तुषार गांधी यांचा समाचार घेतला आहे. ‘आपापल्या पणजोबाच्या पुण्याईवर जगणारे, देशासाठी २ निरुपयोगी जीव… अहो रुपम् अहो ध्वनीम्…’, अशा आशयाचे ट्वीट त्यांनी केले आहे.