काँग्रेस नेहमीच जनतेचा आवाज बनेल : मायकल लोबो

पणजी : गोव्यातील जनतेचा नेहमीच आवाज बनून राहणार असे आश्वासन देत काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते मायकल लोबो यांनी सोमवारी सांगितले की, लोकांचे प्रश्न मांडण्याबरोबरच पक्षाचे पुनरुज्जीवन करुन लोकांचा विश्वास पुन्हा मिळवून ध्येय साध्य केले जाईल.  लोकांना आता कळले आहे की, वेगळ्या दिशेने मतदान केले तर भाजपची सत्ता येते. असे पुन्हा होऊ नये. असे ते  म्हणाले.

मायकल लोबो म्हणाले की, गोव्यातील लोकांना बदल हवा होता कारण त्यांना त्यांचे ऐकणारे सरकार हवे होते. “पण मतांच्या विभाजनामुळे हे होऊ शकले नाही. निकालानंतर लोकांना त्यांचा ‘निर्णय’ कळला.” असे लोबो  म्हणाले. काँग्रेस सोडून ‘नवी पहाट’मध्ये सामील झालेल्यांना पुन्हा पक्षात आणून काँग्रेसला मजबूत बनवावे लागेल, असे लोबो म्हणाले.

आम्ही आमचे गट मजबूत बनवण्यावर आणि आमच्या कृती पुनरुज्जीवित करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. भविष्यात आम्हाला आव्हानांना सामोरे जावे लागेल आणि पंचायत आणि लोकसभा निवडणुकीत आम्हाला स्वतःला सिद्ध करावे लागेल.” असे ते म्हणाले. ते म्हणाले की, गोव्यात अनेक प्रश्न आहेत, ते विधानसभेत आणि सर्व व्यासपीठांवर मांडण्याची गरज आहे. आपण चाळीसही गटांचे  पुनरुज्जीवन करूया. चला एक नवीन सुरुवात करूया.” असे लोबो म्हणाले.