प्रसारमाध्यमे आपली भूमिका लावून धरतील अशी अपेक्षा ठेवू नका मात्र…; अजितदादांचा पक्षातील महिला नेत्यांना मोलाचा सल्ला

मुंबई – राष्ट्रवादी महिला काँग्रेसची (NCP) राज्यस्तरीय बैठक आज प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) व पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयात आज पार पडली.

या बैठकीमध्ये अजित पवार यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या बैठकी महिलांना संबोधित करताना देशभरात आणि राज्यभरात अनेक घटना घडत असल्याने लोकांचा आज उद्रेक होत आहे. या गोष्टीबाबत प्रबोधन करणे गरजेचे आहे. त्यासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेसने हाती घेतलेला जन जागरण यात्रा उपक्रम महत्त्वाचा असल्याचे स्पष्ट केले.

नुसते हायवे झाले म्हणजे विकास झाला असे या सरकारला वाटते. महागाई, रोजगार हा विषय सरकारला महत्त्वाचा वाटत नाही. यासाठी सर्व भगिनींनी पुढे यायला हवे. या सरकारविरोधात आवाज उठायला हवा. जिल्ह्याजिल्ह्यात, गावागावात हा उपक्रम यशस्वी करायला हवा, असे आवाहनही जयंत पाटील यांनी केले.