‘निवडणुका येतील व जातील पण असा घाबरणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राला परवडणार नाही’

मुंबई – शिवसेना आणि भाजप (Shiv Sena and BJP) या दोन्ही पक्षांनी राज्यसभा निवडणूक प्रतिष्ठेची बनवली आहे. (rajya-sabha-elections) राज्यसभेची सहावी जागा कोणत्याही परिस्थितीत जिंकायची असा निर्धार दोन्ही बाजूच्या नेत्यांनी व्यक्त केला असून या निवडणुकीत विरोधी पक्षाला धूळ चारण्यासाठी दोन्ही पक्षातील दिग्गज नेते व्यूहरचना करत आहेत. यातच एकमेकांवर घोडेबाजार करत असल्याचा देखील आरोप केला जात आहे.

शिवसेना आणि भाजपचे उमेदवार रिंगणात असले तरी महाविकास आघाडी सरकारची प्रतिष्ठा (Reputation of Mahavikas Aghadi government) या निवडणुकीत लागली आहे. सहावा उमेदवार निवडून आणण्यासाठी शिवसेना आणि महाविकास आघाडीला प्रयत्नांची शिकस्त करावी लागणार आहे. राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha election 2022) कोणताही धोका पत्करायचा नाही, असे धोरण ठेवून शिवसेना आमदारांना (Shiv sena MLAs) आता मडमधल्या ‘रिट्रीट’मध्ये पाठवण्यात आले. सध्या दोन्ही बाजूने विजयाचे दावे केले जात असून या निवडणुकीत विजयाचा गुलाल आता कोण उधळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, शिवसेना आमदारांना हॉटेलमध्ये रवानगी करण्यात आल्याच्या घडामोडींवर भाजप नेते निलेश राणे (BJP leader Nilesh Rane) यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, स्वतःच्याच आमदारांवर इतका अविश्वास (Distrust) दाखवणारा महाराष्ट्राचा पहिलाच मुख्यमंत्री असेल. निवडणुका येतील व जातील पण असा घाबरणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राला परवडणार नाही, ज्या मुख्यमंत्र्याचा स्वतःच्या आमदारांवर विश्वास नाही ते सरकार कसं चालत असेल हे वेगळे सांगायची गरज नाही.असं राणे म्हणाले.