‘एकनाथ शिंदे साहेब कोणाच्या सांगण्यावरून सुरतेला आमदार घेऊन गेले हे फडणविसांनी सांगावं’

Mumbai – मागील काही दिवसांपासून आमदार बच्चू कडू विरुद्ध आमदार रवी राणा असा संघर्ष सुरु आहे. रवी राणा यांनी कडू यांच्यावर अनेक गंभीर आरोप केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कडू यांच्या बाजूने मैदानात उतरले आहेत. माझ्या एका फोनवर बच्चू कडू गुवाहाटीला गेले, असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केलाय.

फडणवीस काय म्हणाले?
बच्चू कडू माझ्या एका फोन कॉलवर गुवाहाटीला गेले होते. बच्चू कडू यांना मी स्वत: फोन केला. त्यांना म्हटलं की आपल्याला सरकार बनवायचंय. आमची अशी इच्छा आहे की आपण युतीत असावं. त्यामुळे आपण गुवाहाटीला गेलं पाहिजे. या माझ्या एका फोनवर बच्चू कडू गुवाहाटीला गेले, असं फडणवीसांनी सांगितलं.

राष्ट्रवादीची टीका 

आ.श्री बच्चू कडू हे माझ्या सांगण्यावर गुवाहाटीला गेले असे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हणाले, असो. मग श्री एकनाथ शिंदे साहेब कोणाच्या सांगण्यावरून सुरतेला आमदार घेऊन गेले आता हे पण सांगा. असं राष्ट्रवादीचे नेते महेश तपासे यांनी देवेंद्र फडणविसांना आव्हान दिले आहे.