मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे, मलाही कुणबी प्रमाणपत्र हवंय : गौतमी पाटील

Gautami Patil On Maratha Reservation: महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला आहे. मनोज जरांगे पाटील हे वेळोवेळी सभा घेत मराठा बांधवांना आणि राज्य सरकारला लवकरात लवकर मराठा आरक्षण मिळवून द्यावे, याची आठवण करुन देत आहेत. अशातच आता महाराष्ट्रातील लाखो तरुणांच्या हृदयाची धडकन असलेल्या गौतमी पाटील हिनेही मराठा आरक्षणाची मागणी केली आहे.

पुण्यातील पत्रकार परिषदेत मराठा आरक्षणाबद्दल प्रश्न विचारल्यानंतर गौतमी पाटील म्हणाली, “मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. साहजिक आहे आज अनेकांना आरक्षण हवंय तर ते मिळेलच पाहिजे. मला देखील आरक्षण हवंय. मला देखील कुणबी प्रमाणपत्र हवंय”. पुढे गौतमी म्हणाली, “कोरोना काळात माझी ही परिस्थिती खूप हालाखीची होती. हे क्षेत्र चालायला हवं. सध्या सगळं नीट सुरू आहे.”

महत्वाच्या बातम्या-