ठाकरेंनी राजीमाना दिला नसता तर आम्ही परिस्थिती पूर्ववत करू शकलो असतो – SC 

Maharashtra Political crisis –   महाराष्ट्र आणि देशासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे (Eknath Shinde) विरुद्ध उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सत्ता संघर्षाचा सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. सोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी नेमलेले व्हिप भरत गोगावले बेकायदेशीर आहेत असे न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. संसदीय पक्षाच्या नेत्याला व्हीपचा अधिकार नाही, व्हीपचा अधिकार पार्टीच्या नेत्याकडे असल्याचे कोर्टाने म्हटले आहे.

दरम्यान, दुसऱ्या बाजूला या संपूर्ण घडामोडीत ठाकरेंचा राजीनामा (Uddhav Thackeray Resignation) हा आज कळीचा मुद्दा ठरला आहे.  उद्धव ठाकरेंनी राजीनामा देणे चुकीचा होता. त्यांनी राजीनामा दिला नसता तर आम्ही परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न केले असते.  त्यामुळे शिंदे सरकार बचावलं आहे त्यामुळे एकनाथ शिंदेच्या सरकारला कोणताही धोका नाही.