कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनचा संसर्ग चार पट जास्त – राजेश टोपे

rajesh tope

मुंबई : दक्षिण आफ्रिकेमध्ये आढळलेल्या नवीन कोरोना (Corona) व्हेरिएंटमुळे जगभरात पुन्हा एकदा भितीचं आणि चिंतेचं वातावरण निर्माण झाले आहे. नवा व्हेरिएंट अधिक धोकादायक असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. या व्हेरिएंट करोनाच्या डेल्टा व्हेरिएंटपेक्षाही अधिक वेगाने पसरणारा असून तो अधिक घातकही आहे. नुकतंच B.1.1.529 या व्हेरिएंटला जागतिक आरोग्य संघटनेने ओमीक्रोन (Omicron Variant) असं नाव दिलं आहे.

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी देखील या विषाणू बद्दल चिंता व्यक्त केली आहे. ओमिक्रॉन हा विषाणू सध्याच्या विषाणूपेक्षा चारपट वेगाने पसरत आहे. आरटीपीसीआर टेस्टच्या माध्यमातून या विषाणूचा संसर्ग ओळखता येऊ शकतो. लसीकरणाला हा विषाणू एस्केप करतो का ? हे पाहावं लागणार आहे. मी केंद्राला दोन महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या प्रवाशांची यादी काढली जात आहे. या देशातून येणारे विमान थांबवले पाहिजेत. हा विषय केंद्राच्या अखत्यारीत येतं. या मागणीवर सध्या काही निर्णय झालेला नाही, असे राजेश टोपे म्हणाले.

दरम्यान, कोविडच्या दोन्ही लाटांचा आपण चांगला मुकाबला केला आहे, मात्र आता या विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचे आव्हान चिंता वाढवणारे असून याची घातकता लक्षात घेता कोणत्याही परिस्थितीत संसर्ग वाढू नये म्हणून मुंबईसह सर्व जिल्ह्यांच्या प्रशासनाने अतिशय काळजी घ्यावी. परत एकदा संसर्गाचा वाढ झाली तर लॉकडाऊनसारखे पाऊल परवडणारे नाही, त्यामुळे परत लॉकडाऊन लागू द्यायचा नाही या निर्धाराने नियमित मास्क वापरणे, अनावश्यक गर्दी न करणे, सुरक्षित अंतर पाळणे अशी काही बंधने पाळावीत लागतील असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आवाहन केले आहे.

तर, लसीचे दोन्ही डोस प्रत्येकाने घेणे, विशेषतः विमानतळावरून येणाऱ्या आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत प्रवाशांची काटेकोर चाचणी करणे यादृष्टीने आज जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले. यासंदर्भात केंद्राकडून येणाऱ्या सूचनांची वाट न पाहता युद्धपातळीवर जे जे गरजेचे वाटते ते निर्णय घेऊन आवश्यक पाऊले लगेच टाकावीत असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

हे देखील पहा 

https://www.youtube.com/watch?v=FkhUTw1OjTM

Previous Post
shankarrao gadakh

रस्त्याचे प्रश्न प्राधान्याने सोडणार, आणखी काही कामे असतील तर सांगा – शंकरराव गडाख

Next Post
atul bhatkhalkar - jitendra awhad

‘खंडणी सरकारच्या गेल्या दोन वर्षांच्या कारकीर्दीतचे फलित म्हणजे सुपारीचे खांड’

Related Posts
Worlds First AI Teacher | शिक्षण क्षेत्रात क्रांतिकारी बदल! केरळच्या शाळेत मुलांना शिकवायला आली देशातली पहिली AI शिक्षिका, काय आहे तिची खासियत?

Worlds First AI Teacher | शिक्षण क्षेत्रात क्रांतिकारी बदल! केरळच्या शाळेत मुलांना शिकवायला आली देशातली पहिली AI शिक्षिका, काय आहे तिची खासियत?

Worlds First AI Teacher : आजच्या काळात तंत्रज्ञानामुळे लोकांचे काम अधिकाधिक सोपे होत आहे. त्यामुळे तासन्तास लागणारे काम…
Read More
पहिल्या ‘नॉक ९९ करंडक’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धेचे ११ ऑक्टोबर पासून आयोजन !!

पहिल्या ‘नॉक ९९ करंडक’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धेचे ११ ऑक्टोबर पासून आयोजन !!

Pune Cricket –  क्रिकेट नेक्स्ट अ‍ॅकॅडमी (Cricket Next Academy) तर्फे पहिल्या ‘नॉक ९९ करंडक’ (Knock 99 trophy) अजिंक्यपद…
Read More