काँग्रेसने AIMIM लोकांना दूध पाजून मोठे केले नसते तर…; टी राजा यांचा असदुद्दीन ओवेसींवर निशाणा

Telangana Assembly Election: तेलंगणातील विधानसभा निवडणुकीबाबत पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची फैरी सुरू झाली आहे. दरम्यान, तेलंगणातील गोशामहल मतदारसंघातील भाजपचे उमेदवार टी राजा सिंह (T Raja Singh) यांनी काँग्रेस आणि एआयएमआयएमवर जोरदार निशाणा साधला. काँग्रेस मुस्लिमांची मते भारत राष्ट्र समितीला (BRS) विकते, असा दावा त्यांनी केला.

ते म्हणाले, काँग्रेसने एआयएमआयएमच्या लोकांना दूध पाजून इतके मोठे केले नसते तर ते आज इतके मोठे झाले नसते आणि निवडणुकीच्या राज्यात जाऊन इतर पक्षांना ब्लॅकमेल करून पैसे कमावले नसते.टी राजा सिंह म्हणाले, एआयएमआयएम आज काँग्रेसचा शत्रू बनला असला, तरी पूर्वी दोघेही मित्र होते. पूर्वी दोघेही एकत्र जागा वाटून मते विकायचे.

आजतकशी बोलताना टी राजा म्हणाले, काँग्रेस सरकारच्या काळात एआयएमआयएमने काँग्रेसचे पाय धरून व्यवसाय केला. सरकारच्या मदतीने हे लोक सरकारी जमिनींवर कब्जा करून पैसे कमवतात. आज नाही तर उद्या तेलंगणात भाजपचे सरकार येईल. असदुद्दीन ओवेसींना आम्ही कुठे पाठवणार हे काळच सांगेल. देशद्रोह्यांना पाठिंबा देणाऱ्यांना भाजपमध्ये स्थान नाही.

महत्वाच्या बातम्या-

Apple लवकरच OLED डिस्प्लेसह IPad Air आणि IPad Pro चे दोन नवीन मॉडेल लॉन्च करणार?

Latur News : महाराष्ट्राची मान शरमेने झुकली; सत्तरी ओलांडलेल्या मौलानाने केले मोठे कांड

पाकिस्तानी क्रिकेटर अब्दुल रज्जाकने ऐश्वर्यावर केली अश्लील टिप्पणी केली,म्हणाला,…