Jayant Patil | निवडणुका लागतील म्हणून घाई गडबडीने श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली
Jayant Patil : राम मंदिरासाठी (Ram temple) जगातील लोकांनी मनी ऑर्डरने पैसे पाठवले अजून कळस बांधण्याचा बाकी आहे, पण निवडणुका लागतील म्हणून घाई गडबडीने श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी सत्ताधारी पक्षावर केला आहे.
साताऱ्यात बोलताना ते म्हणाले, आज महाराष्ट्रातील लहान मुलालाही कळत आहे की लोक पक्ष सोडून का जात आहेत. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडल्यानंतरही भारतीय जनता पक्षाची मतांची बेरीज होत नाही हे आपण सर्वांनी लक्षात घ्या. महाविकास आघाडीची मते आजही अनेक मतदारसंघात अधिक आहेत. रामराज्य व्हावे हे सामान्य माणसाच्या मनामध्ये होते ते आहे का? याचा विचार करायला पाहिजे. आदरणीय शरद पवार (Sharad Pawar) साहेब झुकत नाहीत म्हणून ते नको आहेत, साहेब हो म्हणत नाहीत म्हणून त्यांचा त्रास होत आहे, साहेब तुमच्या म्हणण्याप्रमाणे वागत नाहीत म्हणून त्यांची अडचण होते म्हणून आज त्यांच्या स्वाभिमानामागे ठामपणाने उभे राहणे ही सर्वांची परीक्षा आहे असे ते म्हणाले.
येणारा काळ हा आपल्या सर्वांच्या परीक्षेचा आहे, या परीक्षेला आपण सर्वांनी उतरले पाहिजे. प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करून सत्यजीत पाटणकर यांच्या पाठीशी कायम उभे राहायचे आहे. लोकसभा आणि विधानसभेला झाडून काम झाले पाहिजे, आपण सर्वांनी सक्षमपणाने पक्षाचे काम सुरू केले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.
महत्वाच्या बातम्या –
भाजप आमदाराच्या गोळीबारामुळे आणि मुख्यमंत्र्यांवरील आरोपांमुळे महाराष्ट्राची मान शरमेने खाली
Atif Aslam | “पाकड्यांकडून गाणं रेकॉर्ड करून दाखवाच”, मनसेचं बॉलिवूडकरांना थेट आव्हान