उध्वस्त ठाकरेंची अवस्था घरात नाही दाणा पण मला हवालदार म्हणा अशी झाली आहे- ज्योती वाघमारे 

सोलापूर – कर्नाटक मध्ये सिद्धरामय्या सरकारचा शपथविधी पार पाडला. झाडून सगळ्या विरोधी पक्षाच्या नेत्यांना निमंत्रण होतं पण काँग्रेसने कस्पटा समान वागणूक देत उबाठा सेनेच्या कोणत्याही नेत्याला निमंत्रण दिलं नाही अशी टीका शिवसेना प्रवक्त्या प्रा. डॉ. ज्योति वाघमारे (Shiv Sena spokesperson Jyoti Waghmare) यांनी केली आहे.

काँग्रेसच्या सत्ता प्राप्तीचा आनंद आपल्यालाच पुत्र जन्माला आला या पद्धतीने पेढे वाटून करणाऱ्यांना मात्र बारशाचे आमंत्रण नव्हतं. भारत जोडो यात्रेमध्ये राहुल गांधींच्या सोबत फिरलं आणि सगळीकडे काँग्रेसचा प्रचार केला तर सिद्धारामया यांच्या पेक्षाही मोठी खुर्ची देऊन आपल्याला बोलावतील असं उद्धव ठाकरेंना वाटलं होतं का असा रोकडा सवाल शिवसेना प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी विचारला.