अन्याय होत असेल तर खडसेंनी कोर्टात जावे; गुलाबराव पाटील यांचा खोचक सल्ला

जळगाव – खोटा गुन्हा दाखल करून अटक करण्याच षडयंत्र केलं जात असल्याचा धक्कादायक गौप्यस्पोट एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केला होता. यावर मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोणताही गुन्हा खोटा दाखल होत नसतो, पोलीस चौकशी करूनच गुन्हा दाखल करतात, जे होत आहे ते पाहावे, अन्याय होत असेल तर आपल्यासाठी कोर्ट आहे या शब्दात मंत्री गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसे यांना उत्तर दिले आहे.

दरम्यान, शिंदे गटाकडून धमक्या दिला जात असल्याचा आरोप उद्धव ठाकरे समर्थकांनी जळगावातील एका मेळाव्यात केला आहे. यावरही मंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांचे मत व्यक्त केलं. कोणी धमकी दिली हे जाहीर करावं वाऱ्याला लाथा मारू नये. माझा धंदा हा लोकांची कामे करण्याचा आहे धमकी देण्याचा नव्हे, जे काम करत नाही ते अशाच पद्धतीने उलट्या गोष्टी करतात त्यामुळे त्यांनी काम करावं, लोकांमध्ये विनाकारण गैरसमज पसरवू नये, असं उत्तर मंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरे समर्थकांना दिले आहे.