कोणत्याही क्षणी उद्धव ठाकरे यांच्या घोटाळ्याची लंका जळू शकते – सोमय्या

मुंबई – भाजप नेते किरीट सोमय्या (BJP leader Kirit Somaiya) यांनी आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) आणि राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रत्येक क्षणी असे वाटत आहे त्याच्या घोटाळ्याच्या लंकेत हनुमान स्वतः येऊन आग लावणार आहे. ठाकरे सरकारला भीती वाटणे ही स्वाभाविकच आहे. काही मंत्री जेलमध्ये तर अनेक मंत्री बेलवर आहेत. ठाकरे परिवाराची बेनामी संपत्ती आता जप्त व्हायला लागलेली आहे त्यामुळे त्यांची अस्वस्थता दिसत आहे. कोणत्याही क्षणी उद्धव ठाकरे यांच्या घोटाळ्याची लंका जळू शकते असा घणाघात त्यांनी केला आहे.

आता आम्ही सर्व भाजप नेते ॲक्शन मोडमध्ये गेलो आहोत आता बुस्टर सभेनंतर आग लावण्याचे काम केले जाणार आहे. उद्धव ठाकरे सरकारचे जे काही घोटाळे आहेत, त्या घोटाळ्यांना आग लावण्याचे काम करून घोटाळे बाजांवर कारवाई केली जाणार असल्याचं किरीट सोमय्या यांनी सांगितले आहे.

आजही सकाळी मी दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांशी बोललो. श्रीधर पाटणकर, उद्धव ठाकरे यांचे मेहुणे यांच्या आणखी एका कंपनीच्या घोट्याल्या विषयी माहिती मी त्यांना दिली आहे. आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे व पाटणकर यांचा त्यात समावेश आहे. याचा पाठपुरावा करण्यासाठी मी गुरुवार व शुक्रवारी दिल्लीला जाणार आहे, असे सोमय्या म्हणाले.