भाजपत रंगीबेरंगी माणसं भरून पुरती वाट लावली; मनोज जरागेंची देवेंद्र फडणवीसांवर टीका

Manoj Jarange – मराठा आरक्षणासाठी लढा देत असलेल्या मनोज जरांगे पाटील बीडमधील आंदोलकांवर गुन्हे दाखल करणार असल्याचे समजताच चांगलेच संतप्त झाले. त्यांनी पत्रकार परिषद घेत पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस(Home Minister Devendra Fadnavis)  यांच्यावर थेट राजकीय स्वरुपाची टीका केली.

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, अगोदर आमचे आंदोलन नंतर तुमची संचारबंदी. बीडमधील पोरांवर गुन्हे दाखल केल्यास मी बीडमध्ये कलेक्टर, एसपी कार्यालयासमोर 10 लाख आंदोलक घेऊन बसेन. महाराष्ट्रातील कोणत्याही आंदोलकाला त्रास दिल्यास आम्ही तुम्हाला सोडणार नाही. एकदा झालं आहे, आता पुढे सहन करणार नाही.

ते पुढे म्हणाले की, केजमधील लोकांना उचलण्याची गरज नव्हती, ते आंदोलन करत होते. बीडचे एसपी जातीयवादी आहेत. तुम्ही तुमच्या लोकांना तंबी द्या. बीडसह महराष्ट्रातील लोकांना त्रास देऊ नका. अधिवेशन बोलवा असे मुख्यमंत्री यांना स्पष्ट सांगितले होते. जेवढ्या नोंदी तेवढेच प्रमाणापत्र जमणार नाही, मग तुमचं आमचं जमणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

फडणवीस यांच्यावर टीका करताना ते म्हणाले,  घरं कोणी जाळले आम्हाला माहिती नाही, भाजप तुमच्यामुळेच संपत आहे.आमच्या पैशावर बासुंदी ,गुलाबजामुन खाल्ले,करा काय करायचे ते करा, तुम्ही किती ताकतवर आहे, किती 307 करायचे ते करा? असे जाहीर आव्हानच त्यांनी दिले.

महत्वाच्या बातम्या-

बस फोडून आरक्षण कसे मिळते बुवा? केतकी चितळेचा सवाल

न्या. शिंदे समितीचा पहिला अहवाल स्वीकारला; कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरु

झिरो Subscribers सोबतही You Tubeवरुन कमवा पैसा, ही एक ट्रिक तुम्हाला बनवेल मालामाल!