ज्यांना ९६ कुळी राहायचं आहे अशा लोकांनी…; मनोज जरांगे पाटील यांनी मांडली रोखठोक भूमिका

Manoj Jarange Patil – राज्य सरकारने मराठवाड्यातील मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. पण मनोज जरांगे यांनी सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावं, अशी मागणी केली आहे. मनोज जरांगे यांच्या नव्या मागणीमुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. मराठा समाजात अनेक उपजाती आहेत. कुणी ९६ कुळी तर कुणी ९२ कुळी असल्याचा दावा करतो. त्यामुळे संबंधित लोकांना कुणबी बनवलेलं चालणार आहे का? असा प्रश्न निर्माण होत आहे. यावर आता मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

आमचं म्हणणं असं आहे की, ज्यांना ९६ कुळी राहायचं आहे किंवा त्याला कुणबी प्रमाणपत्र घ्यायचं नाही. अशा लोकांनी कुणबी प्रमाणपत्र घेऊ नये. त्यांना जबरदस्ती केली जाणार नाही. त्यांनी बिंदास्त मोकळं राहावं. त्यांनी मोठा पाटील किंवा बारीक पाटील, जसं राहायचं तसं राहावं. पण गोरगरीब पोरांचं कल्याण होऊ द्या, त्यांनी कुणबी जात प्रमाणपत्राला विरोध करू नये, असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं.

कारण तुम्हाला कुणबी प्रमाणपत्र घ्यायचं नसेल तर घेऊ नका. तुम्हाला जोरजबरदस्ती केली नाही. तुम्हाला जेव्हा ३०-४० वर्षांनी वाटेल, की आता कुणबी प्रमाणपत्र घ्यायला हवं, तेव्हा त्यांनी कुणबी प्रमाणपत्र काढावं. तोपर्यंत मोठा पाटील म्हणून राहा. वाड्यावर राहा. बंगल्यावर राहा. रानात जाऊन राहा नाहीतर तिकडे डांबरीवर जाऊन झोप…पण विरोध करू नको”, अशी रोखठोक भूमिका जरांगे पाटलांनी मांडली आहे. ते ‘झी २४ तास’ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

महत्त्वाच्या बातम्याः

‘देश, संविधान व लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेस, इंडिया आघाडी व राहुल गांधी यांची लढाई सुरु आहे’

वनडे विश्वचषकानंतर राहुल द्रविड सोडू शकतात प्रशिक्षकपद, बीसीसीआयला शोधावा लागणार नवा गुरू

“PM मोदींचे अपयश झाकण्यासाठी सनातन धर्माचा वापर”; उदयनिधींचा भाजपवर पलटवार