काळया यादीतील कंत्राटदारांना ‘पावन’ करून घेण्यासाठी मंत्र्याने घेतली १०० कोटींची ‘सुपारी ?

काळया यादीतील कंत्राटदारांना 'पावन' करून घेण्यासाठी मंत्र्याने घेतली १०० कोटींची 'सुपारी?

मुंबई – मुंबई महापालिकेने २०१७-१८ मध्ये काळया यादीत टाकलेल्या कंत्राटदारांना पावन करून घेण्याचे प्रयत्न महाविकास आघाडीच्या एका मंत्र्यांकडून व त्याच्या नातलगाकडून सुरु आहेत. हे उद्योग न थांबल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकाकडे तक्रार दाखल करू, असा इशारा भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कोषाध्यक्ष आ. मिहीर कोटेचा यांनी शुक्रवारी दिला.

भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत आ. कोटेचा बोलत होते. प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये,  मुंबई पालिकेतील भाजपा पक्षनेते विनोद मिश्रा , प्रदेश प्रवक्ते भालचंद्र शिरसाठ, माजी नगरसेवक प्रवीण छेडा यावेळी उपस्थित होते.आ. कोटेचा यांनी सांगितले की. ९७५ कोटींच्या रस्ते बांधणीत गैरप्रकार केल्यामुळे मुंबई महापालिकेच्या ९ कंत्राटदारांना महापालिकेने काळ्या यादीत टाकून त्यांच्याविरुद्ध आवश्यक ती कायदेशीर कारवाईही सुरु केली होती. त्यावेळी कंत्राटदारांबरोबर पालिकेच्या संबंधित अभियंत्यांवरही कारवाई केली होती. महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच कंत्राटदार आणि अभियंत्यांना तुरुंगात जावे लागले होते.

या कंत्राटदारांना ७ वर्षे काळया यादीत टाकण्यात आले होते. या प्रकरणाची फाईल अजून बंद झालेली नसताना या कंत्राटदारांना पावन करून घेण्याची ‘सुपारी ‘ महाविकास आघाडी सरकारमधील एका मंत्र्याने व त्याच्या मावसभावाने घेतली आहे. या कंत्राटदारांना महापालिकेच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या २२०० कोटींच्या रस्ते बांधणीची निविदा  भरता  येणार आहे. या पैकी आरपीएस इन्फ्रा प्रोजेक्ट्स या एका कंत्राटदाराला पालिकेच्या खातेअंतर्गत चौकशीच्या माध्यमातून निर्दोष ठरविण्यातही आले आहे. या विरोधात आपण लाचलुचपत प्रतिबंधक महासंचालकांकडे मुंबई पालिकेच्या रस्ते प्रकल्प संचालकांची चौकशी करण्याची मागणी करणार आहोत, असेही आ. कोटेचा यांनी नमूद केले.

https://www.youtube.com/watch?v=GmVj7hqrh5o&t=1s

Previous Post
राजे समरजितसिंह घाटगे यांना साखर उद्योग गौरव पुरस्कार जाहीर

राजे समरजितसिंह घाटगे यांना साखर उद्योग गौरव पुरस्कार जाहीर

Next Post
'नवाब मलिक या शहरातील भंगारांचे एक एक नटबोल्ट खोलून भट्टीत टाकून पाणी केल्याशिवाय थांबणार नाही'

‘नवाब मलिक या शहरातील भंगारांचे एक एक नटबोल्ट खोलून भट्टीत टाकून पाणी केल्याशिवाय थांबणार नाही’

Related Posts
40 वर्षात काय केलं? शरद पवार यांच्याविरोधात मराठा आंदोलकांनी केली जोरदार घोषणाबाजी

40 वर्षात काय केलं? शरद पवार यांच्याविरोधात मराठा आंदोलकांनी केली जोरदार घोषणाबाजी

Jalna Lathicharge Case : – जालना जिल्ह्यातल्या अंतरवली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी…
Read More
प्रमोद सावंत

गोवा : द काश्मीर फाईल्स चित्रपट करमुक्त केल्याने कॉंग्रेसची मुख्यमंत्र्यांवर टीका

पणजी –  काश्मिरी पंडितांच्या व्यथा मांडणाऱ्या द काश्मीर फाईल्स या चित्रपटामुळे कॉंग्रेसला चांगल्याच मिरच्या झोंबल्या असल्याचे चित्र आहे.…
Read More
'लोकांचे जीवन निघून जाते पण...' अर्जुन पुरस्काराबाबत मोहम्मद शमीची पहिली प्रतिक्रिया समोर

‘लोकांचे जीवन निघून जाते पण…’ अर्जुन पुरस्काराबाबत मोहम्मद शमीची पहिली प्रतिक्रिया समोर

Mohammed Shami Arjuna Award: विश्वचषक 2023 मध्ये (World Cup 2023) आपल्या स्फोटक गोलंदाजीने शो चोरणाऱ्या मोहम्मद शमीला त्याच्या…
Read More