मोहनजी पाकिस्तानवर हल्ला करा मी सोबत असेल – प्रवीण तोगडिया

नागपूर –  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी नुकतेच एक वक्तव्य केले असून या वक्तव्याची सध्या बरीच चर्चा होताना दिसत आहे. भागवत यांनी  पुढील १५ वर्षात अखंड भारत (Akhand Bharat) होईल आणि आपल्या सर्वांना तो पहायला मिळेल असं विधान केलं आहे. हिंदू राष्ट्र हाच सनातन धर्म आहे असंही यावेळी त्यांनी सांगितलं. हरिद्वारमध्ये (Haridwar) बोलताना  ते म्हणाले की, संतांच्या ज्योतिषशास्त्रानुसार (Astrology)  20 ते 25 वर्षांत भारत पुन्हा अखंड भारत (Unified India) होईल. आपण सर्वांनी मिळून या कामाचा वेग वाढवला तर 10 ते 15 वर्षात अखंड भारताची निर्मिती होईल.

दरम्यान, या वक्तव्याची सध्या चांगलीच चर्चा होत असताना आता अंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे प्रमुख प्रविण तोगडिया (Praveen Togadia) यांनी देखील केलेले एक वक्तव्य चांगलेच चर्चेत आले आहे.  मोहन भागवत (Mohan Bhagwatji) म्हणतात 15 वर्षात अखंड भारत निर्माण करायचा आहे. आता त्यांची सत्ता आहे. त्यामुळे त्यांनी बोलण्यापेक्षा करून दाखवावे. असं त्यांनी म्हटले आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले, यासाठी  पहिले पाऊल म्हणून त्यांनी कश्मीर (kashmir) घाटीत हिंदूला वसवावे आणि एक रात्र तिथे काढावी मी त्यांच्या सोबत असेल, संघाने पाक व्याप्त काश्मिर मधे संघाची शाखा लावावी मी त्या शाखेत असेल, तिसरे पाकिस्तानवर (pakistan) टॅंकवर बसून हल्ला करावा मी त्यांचा टॅंक ज्या रस्त्याने जाणार असेल तो रस्ता साफ करण्याचे काम करेल असेही प्रवीण तोगडिया यांनी म्हणले आहे .