‘एका बाईची बददुवा कधी वाया जाणार नाही, हनुमानजींनी त्यांना दंड दिला आणि ठाकरे सरकार पडलं’

Amravati- अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा (Navneet Rana) या सातत्याने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधत आहेत. आता पुन्हा एकदा नवनीत राणांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडले आहे. उद्धव ठाकरेंनी त्यांची सत्ता असताना आपल्याला तुरुंगात टाकलं. त्यावेळी आपण हनुमान चालिसा वाचली आणि हनुमान देवाने त्यांना शिक्षा दिल्याने महाविकास आघाडीचे सरकार कोसळले, अशी टीका नवनीत राणींनी उद्धव ठाकरेंवर केली आहे. त्या अमरावतीतील एका कार्यक्रमात बोलत होत्या.

महाआघाडी सरकारच्या काळात मला १४ दिवस ४७ डिग्री तापमानात जेलमध्ये राहावे लागले. तेव्हा मी सतत 15-16 तास हनुमान चालीसा वाचन केलं. त्याचवेळी मी म्हटलं एका बाईची बददुवा कधी वाया जाणार नाही. ती वायाही गेली नाही. हनुमानजीने त्यांना दंड दिला आणि ठाकरे सरकार पडलं, अशी टीका खासदार नवनीत राणा (Navneet Rana Criticize Uddhav Thackeray) यांनी केली.