मुंबईचा महापौर बंगला लोकांना विचारून ढापला का? राज यांची बोचरी टीका

 रत्नागिरी – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही काल रत्नागिरीमध्ये जाहीर सभा घेतली. पर्यटनाच्या माध्यमातून कोकणचा विकास साधायला हवा अशी अपेक्षा राज ठाकरे यांनी व्यक्त केली. यावेळी राज ठाकरे यांनी शिवसेनेची रिफायनरीसाठी भूमिका नक्की काय आहे? असा सवाल करत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

राज म्हणाले की, शिवसेनेची भूमिका नक्की आहे आहे रिफायनरीबाबत? खासदार म्हणतात होणार नाही, पक्ष नसलेल्या पक्षाचे प्रमुख आता म्हणतात की लोकांच्या भावना असतील तसं होईल. मग बाळासाहेबांच्या स्मारकासाठी मुंबईचा महापौर बंगला हडपलात तेव्हा जनतेला विचारलंत? शिवसेनेची रिफायनरीसाठी भूमिका नक्की काय आहे? अशी विचारणा राज यांनी केली.