राज ठाकरे जोपर्यंत त्यांचा अहंकार सोडत नाहीत तोपर्यंत त्यांना अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही – ब्रिजभूषण शरण सिंह

अयोध्या – उत्तर प्रदेशचे भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह (BJP MP Brijbhushan Singh) यांची नौटंकी सुरूच असल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Chief Minister Yogi Adityanath) यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी  बोलतान ब्रिजभूषण सिंह यांनी पुन्हा एकदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS president Raj Thackeray) यांना इशारा दिला आहे.

जोपर्यंत राज ठाकरे आपला अहंकार (Ego) सोडत नाहीत, तोपर्यंत त्यांच्यावर श्रीरामाची कृपा होणार नाही. जोपर्यंत त्यांचा अहंकार मोडत नाही, तोपर्यंत ते उत्तर भारतात येऊ शकणार नाही. राज ठाकरे हे दुर्दैवी आहेत, जर ते समजूतदार असतील तर जनतेची माफी मागायला काहीच हरकत नव्हती. इतिहास आहे, मोठमोठ्या राजांनी महाराजांनी, सम्राटांनी, संतांनीही जनतेची माफी मागितली आहे. असं ते म्हणाले.

आम्ही राज ठाकरेंना रोखले नाही, त्यांच्या अहंकाराने राज ठाकरेंना अयोध्येत येण्यापासून रोखले आहे. जोपर्यंत त्यांचा अहंकार मोडत नाही, तोपर्यंत ते उत्तर भारतात पाऊल ठेवू शकणार नाहीत, असंही ब्रिजभूषण सिंह यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे 5 जूनला अयोध्या दौऱ्यावर जाणार होते. पण नंतर तब्येत बरी नसल्याचे सांगत त्यांनी हा दौरा रद्द केला. त्यांच्या दौऱ्याला ब्रिजभूषण शरण सिंह यांनी विरोध केला होता.