सेनेने मुख्यमंत्री पदाच्या हव्यासापोटी भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला – आठवले

पुणे – भारतीय जनता पक्षासोबत सेनेने (Shivsena) निवडणूक लढवली पण नंतर मुख्यमंत्री पदाच्या हव्यासापोटी त्यांनी पाठीत खंजीर खुपसला. आशा खरपूस शब्दात केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी सेनेवर टीका केली.राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पडावा मेळाव्यात शिवसेनेवर केलेल्या टिकेलाही आमचा पाठिंबा असल्याचेही ते म्हणाले.

पिंपरी चिंचवड मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. येणाऱ्या महापालिकेत भारतीय जनता पक्षाबरोबर (BJP) आम्ही युती करणार असल्याचे सांगतानाच मुंबईतून शिवसेनेच्या हातातून सत्ता घेण्याचं आमचे लक्ष्य असल्याचं त्यांनी म्हंटलंय.या वेळी भाजप आणि आर पी आय एकत्र येऊन मुम्बईत शिवसेनेला मोठा धक्का देण्याचे उद्दिष्ट्य असल्याचेही आठवले म्हणाले.

लोकांच्या मनात नरेंद्र मोदी आहेत त्याचमुळे चार राज्यात भाजपचा विजय झालाय. लोकांचा त्यांच्यावर विश्वास आहे त्यामुळे 2024 मध्ये 400 हुन अधिक एनडीए जागा जिंकेल असा दावा आठवले यांनी केला.