करणी सेनेच्या अजय सेंगरची करणी समाजात फूट पाडणारी – रामदास आठवले

मुंबई – कोरेगाव भीमा येथील विजय स्तंभ भूमिपुत्रांना शौर्याची प्रेरणा देणारा विजयस्तंभ असून या स्तंभाला कधीही कोणीही धक्का देऊ शकत नाही. याबाबत करणी सेने च्या अजय सेंगर (Ajay Sengar) ने केलेले वक्तव्य निंदनीय निषेधार्ह असून त्यांची करणी समाजात तणाव निर्माण करून फूट पडणारी आहे.त्यांच्या वर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.

कोरेगाव भीमा येथील विजय स्तंभ ध्वस्त करण्याची आणि शौर्य दिन साजरा करू नये याबाबत करणी सेने ने केलेली मागणी अत्यंत चूक निषेधार्ह आहे. करणी सेने चे अजेय सेंगर यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. अशा वक्तव्यातून आंबेडकरी जनतेच्या भीमसैनिकां च्या भावना भडकविण्याचा सेंगर यांचा प्रयत्न आहे. समाजात फूट पडणाऱ्या अशा प्रवृत्ती वर शासनाने कारवाई केली पाहिजे. आंबेडकरी जनतेने याबाबत संयम बाळगावा आणि सेंगर सारख्या फुटकळ लोकांना महत्व देऊ नये असे आवाहन  रामदास आठवले यांनी केले आहे.