बाबूश यांच्या पावलावर पाऊल ठेऊनच जोशुआचं मार्गक्रमण – सदाभाऊ खोत

म्हापसा : बाबूश यांनी मतदार संघात एक कौटुंबिक नातं तयार केलं आहे. जोशुआ त्यांच्याच पावलावर पाऊल ठेऊन मार्गक्रमण करत आहे. जोशुआ यांच्या वडिलांचा जो जिव्हाळा होता तो आजही लोकांच्या नजरेत मला दिसत आहे. अशा भावना महाराष्ट्राचे माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी बोलून दाखवल्या आहेत. ते आज म्हापश्यात भाजप उमेदवार जोशुआ डिसोजा यांच्या प्रचारासाठी आले होते त्यावेळी त्यांनी जोशुआ यांच्या कामाचे तोंडभरून कौतुक केले.

‘जोशुआ सारखा नम्र आणि एका संस्कारी कटुंबात वाढललेला युवक आज भारतीय जनता पक्षातून निवडणूक लढवत आहे. कामाचा ध्यास घेऊन झटणारा एक उमेदवार म्हापशातून भाजपने दिला आहे ते निश्चित विजयी होतील’. असा विश्वास सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केला आहे.

तर, इथं जे विरोधीपक्ष निवडणूक लढवत आहेत त्यांच्याकडे ना विकासाचे व्हिजन आहे ना देशाप्रती अभिमान त्यामुळे अशा लोकांना निवडणून दिले तर विकासासाठी तो मोठा अडथळा ठरेल, भारतीय जनता पक्ष हा एक देशाभिमान असणारा पक्ष आहे. व्हिजन असणारा पक्ष आहे. त्यामुळे गोवेकर जनता निश्चितच भाजपला गोव्यात पुन्हा सत्तेत बसवेल असं सदाभाऊ खोत म्हणाले आहेत.