पक्ष पुढे नेईल असा वारसदार निर्माण करण्यात शरद पवार अपयशी, ‘सामना’तून पवारांवर टीका

मुंबई – राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार ( Sharad Pawar) यांना आपला वारस तयार करता आला नाही. त्यात ते अपयशी ठरले आहेत, असं दैनिक ‘सामना’च्या आजच्या अग्रलेखात नमूद करण्यात आलं आहे.दरम्यान, यामुळे महाविकास आघाडीत आणखी तणाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या आत्मचरित्राच्या सुधारित आवृत्तीत उद्धव ठाकरे यांना अपयशी मुख्यमंत्री म्हणण्यात आलं आहे किंवा उद्धव ठाकरेंसंदर्भात शरद पवारांनी केलेल्या लिखाणावरुन ठाकरे गटात नाराजीचा सूर पाहायला मिळाला होता. त्यानुसार सामनातून टीका होईल, अशी चर्चा होती. त्यानंतर आज शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादीवर टीका करण्यात आली असावी असा अंदाज राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.