‘मुंबईत झालेल्या बॉम्ब स्फोटात मारले गेलेले २५७ लोक ‘शरदवासी’ झाले असं म्हणायचे म्हणे मुंबईचे लोक’

Sharad Pawar : समृद्धी महामार्गावर बुलढाणा नजीक काल रात्री झालेल्या अपघातात २५ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटर (Prime Minister Narendra Modi on Twitter) संदेशातून या दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला असून, पंतप्रधान राष्ट्रीय आपत्ती निधीतून, मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत देऊ केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील या दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. राज्य शासनाने मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली असून, जखमी रुग्णांचा खर्चही राज्य सरकार करणार आहे.

दरम्यान, या अतिशय वेदनादायी मुद्द्याचे देखील राजकारण विरोधकांनी सुरु केले आहे. जेष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांचा देखील या दुखद प्रसंगी संयम ढळल्याचे दिसून आले. समृद्धी महामार्गावरील अपघातावर प्रतिक्रिया देताना शरद पवारांनी म्हटलं की, आमच्या गावातील लोक सांगत होते, एखादा दुसऱ्या अपघातात व्यक्ती गेली. तर, लोक म्हणतात या अपघतात एक ‘देवेंद्रवासी’ झाला. रस्ता तयार करण्याच्या संबंध काळात निर्णय घेण्यात, नियोजन आखण्यात ज्यांची जबाबदारी होती, त्यांना सामान्य लोक कळत-नकळत दोषी ठरवतात. पण, आज झालेली अपघाताची घटना ही अत्यंत दु:खद आहे.असं पवारांनी म्हटले आहे.

दरम्यान, या मुद्द्यावर प्रसिद्ध लेखिका शेफाली वैद्य (Shefali Vaidya) यांनीही भाष्य केले आहे. आमच्या गोव्यात लोक सांगत होते की १९९३ मध्ये मुंबईत झालेल्या बॉम्ब स्फोटात मारले गेलेले २५७ लोक ‘शरदवासी’ झाले असं म्हणायचे म्हणे मुंबईचे लोक, असं मी कुठेतरी वाचल्याचं आठवतंय. अर्थात तत्कालिन मुख्यमंत्र्यांबद्दल असं बोलणं चूकच होतं. बॉम्बस्फोट काय, करतच होते दावूदचे लोक छोटे मोठे, पण त्या काळात मुंबईचे रक्षण करण्याची, तिथल्या नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घ्यायची ज्यांची जबाबदारी होती त्यांना लोकांनी कळत नकळत दोषी ठरवले. पण बॉम्ब स्फोटांची घटना अतिशय दुःखद होती. अशी खोचक अप्रत्यक्ष टीका त्यांनी केली आहे.