ऊठ दुपारी अन् घे सुपारी असा आमच्याकडे एक पठ्ठ्या आहे, सुषमा अंधारेंची राज ठाकरेंवर टीका 

 मुंबई – मनसे आणि ठाकरे गटात सध्या आरोप-प्रत्यारोप होताना दिसत असताना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राज ठाकरे यांना डिवचले आहे. ऊठ दुपारी अन् घे सुपारी असा आमच्याकडे एक पठ्ठ्या आहे, अशा शब्दात सुषमा अंधारे यांनी राज ठाकरे यांची खिल्ली उडवली.

राज ठाकरे यांचे टोलचे आंदोलन म्हणजे कावळा बसायला आणि फांदी तुटायला असं होतं. सब मॅनेज किया. वडापाव गाडी, गरीबांवर जोर जबर दाखवत आहेत. पण इमारतीत व्यवसाय करणाऱ्यांवर कधी जोर दाखवणार? असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला.(Sushma Andharen criticizes Raj Thackeray)

मनसे धारावी पॅटनबाबत का बोलत नाही? अंगावर केस नसली तरी काही फरक पडत नाही. फक्त वाया गेलेली केस असू नये, असा हल्लाही त्यांनी राज ठाकरेंवर नाव न घेता चढवला. उद्धव ठाकरे यांच्या आजारावर कोणी नाटक करत असेल तर त्याला चक्र व्याजा सकट उत्तर दिले जाईल, असा इशाराच त्यांनी दिला.